३.०८.२०१३ भंडारदरा धरण
नमस्कार,
अनेक दिवसांपासून कुठे तरी बाहेर पावसाळी
पिकनिक करायचे असा विचार चालू होता पण
वेळ मिळत नव्हता.
आणि अचानक आमचे ठरले ते भंडारदरा येथे जायचे. शुक्रवारी रात्री
निलेश सोबत बोलून प्लान आखला.
येण्याचे सागितले तसे आम्ही कासारयाला उतरून ओमनी
ने घोटीला उतरलो, पहिला
टोलनाक्या पुढे
निलेश आणि प्रियांका त्यांच्या कारच्या बाहेर आमची वाट पाहताच होते. लगेच
आम्ही निघालो भंडारदर्याला. बर्याच दिवसांनी आम्ही भेटलो होतो. दोघांना
भेटून खूप छान वाटले.
भंडारदरा धारणाबद्दल मला मिळालेली माहिती अशी...
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले
तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत
केंद्र आहे. भौगोलिक
अक्षांश- १९० ३१’ ४”
उत्तर; रेखांश
७३० ४’ ५”पूर्व.
भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे
पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
मुख्य आकर्षण
भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय
होत चाललेले पर्यटनस्थळ असुन
दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे.
बॉलीवूडमधील अनेक
दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे
चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग,
हीना, राम
तेरी गंगा
मैली, राजू
चाचा, आणि
देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.)
कळसूबाई
भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे
महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच
शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे.
शिखरावर कळसुबाई
देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी
येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.
अम्ब्रेला फॉल
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा
असून त्याच्या छत्रीसारख्या
वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन
सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला
फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.
रंधा फॉल
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर
रंधा या गावात एक विशाल धबधबा
असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे.
सध्या हा धबधबा त्यावर
असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात
हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक
धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण
क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.
रतनवाडी
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत
रतनवाडी येथे जाता आहे. रतनवाडी येथे
अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंती मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी
नक्षीकाम अत्यंत
सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक् शिवलिंग आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत:
पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा
'नेकलेस
फॉल' हा
विशेष लोकप्रिय
आहे.
घाटघर
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२किमीवर घाटघर
हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक
गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा
प्रवास अतिशय आनंददायी
आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य
पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन
पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला
खुप पाऊस पडतो म्हणुन
यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.
धरणावरच गरम चहा आणि भजीची दुकाने आहेत. तेथे गरम गरम भजी आणि चहा घेतला आणि पुन्हा धरणाच्या भिंतीवर जाउन फोटो काढले.धरण पूर्ण भरून ओसंडून वाहत होते.
संध्याकाळ झाली आणि परतायची झाली. जेवढा जमेल तेवढा निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही सगळे नाशिकला निघालो.
भंडारदरा धरणावर कसे जायचे?
जर मुंबईहून जाणार असाल तर सकाळी लवकर कसारा ट्रेन पकडून कसारा स्टेशनच्या बाहेरच जीप आणि ओम्नी वाले उभे असतात त्यांना घोटी बस स्टोप सांगणे आणि तेथून बस अथवा कोणतेही वाहन करणे. स्वतःचे चारचाकी वाहन असेल तर उत्तम. धरणापासून काही अंतरावर हॉटेल्स असल्याने जेवणाची सोय होते.
माझा ब्लोग कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये अथवा मेलने नक्की कळवा.
धन्यवाद ,
निशांत पोतदार