Translate this blog

banner

Saturday, December 27, 2014

सध्या अपडेट्स नाहीत …


माझ्या प्रिय वाचकांना माझा नमस्कार ,

कामाच्या व्यापामुळे सध्या काहीच अपडेट्स देत येत नाहीत त्याबद्दल क्षमस्व .  लवकरच काहीतरी नवीन घेऊन यायच्या प्रयत्नात आहे.  कामातून वेळ मिळाला तर नक्कीच शेअर करिन.

आपल्या सतत येणाऱ्या मेल्स बद्धल धन्यवाद.  असेच आपले प्रेम अखंड राहु दे हिच नम्र विनंती

आपला नम्र ,
निशांत पोतदार
BBM:2BAED043

पाउलवाटा बी बी एम channel : C003969E9

Sunday, February 16, 2014

उज्जैन

८ फेब्रुवारी २०१४
“अकाल मृत्यू वोह मरे जो काम करे चांडाल का..
काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का...!!”
आयुष्यात पहिल्यांदाच इंदौरला जाण्याचा योग आला. इंदौर बद्दल खूप ऐकून होतो, पण आज लग्नाला गेलो तेव्हा कळाले. मध्यप्रदेशातील इंदौर हे एक नावाजलेले शहर. मुंबई सेन्ट्रल ला जेव्हा अवंतिका एक्सप्रेस मध्ये जेव्हा बसलो तेव्हा इतकेचमाहीत होते की मेहुणीच्या लग्नाला जायचे आहे आणि दुसर्‍या दिवशी परतायचे आहे. ७ तारखेला रात्री लग्न झाले, त्याच वेळेस सासरकडच्या नातेवाईकांशी गप्पा मारताना जवळपासची माहिती विचारली, त्यावर माझे एकट्याचेच उज्जैनला जायचे ठरले.बाकीच्यांचे हो नाही असेच होते. पण शेवटी सगळे एकमत झाले आणि ८ तारखेला बायको, मेहुणा आणि सासू सासरे आम्ही यजमानांचा निरोप घेऊन उज्जैन ला जायला निघालो.
इंदौर बस डेपोवरून उज्जैनला जाणारी बस मिळाली. आणि आमचा प्रवास सुरु झाला. जवळजवळ दिड तास प्रवास करून आम्ही उज्जैनला सकाळी १०.३० ला पोहोचलो.
रिक्षा करून जवळच्या एका गेस्टहाउस वर उतरून अंघोळी उरकल्या, मधल्या वेळेत हॉटेल मालकाला जवळ बघण्यासारखे काय आहे असे विचारले असता एकदम नम्रतेने त्याने सांगीतलेकीजवळच२ मिनिटांवर श्री महाकालेश्वराचे मंदिर आहे आणि आजूबाजूला आणखी काही बघण्यासारखी मंदिरे आहेत.
1.       महाकालेश्वर मंदिर
2.       श्री बडे गणेशजी मंदिर
3.       मां हरसिद्धीमाता मंदिर
4.       राम मंदिर
5.       श्री राम घाट (शिप्रा नदी)
6.       श्री राजा विक्रमादित्य
7.       श्रीमंगलनाथ मंदिर
8.       सिद्धवट मंदिर
9.       श्रीकालभैरव मंदिर
10.   श्रीगढकालिका मंदिर
11.   श्रीभृर्थहारी गुंफा
12.   श्री संदीपनी आश्रम
वरील पैकी ६ मंदिरे जवळपासच आहेत. पूर्ण १२ मंदिरे पाहण्यासाठी महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर ओम्नी कार असतात. ड्रायवरच गाईडचे काम करतात. प्रत्येकीरुपये १००/- घेऊन सर्व मंदिरे फिरवून आणतात. (नोट: ड्रायवरचामोबाइल नंबर पुढे देत आहेच, त्यामुळे जास्त विचार करू नका.)
महाकालेश्वर मंदिर:
अति प्राचीन असे हे मंदिर आहे. मंदिरा जवळ सुद्धा गेस्ट हाउस आहेत, त्यामुळे जमल्यास रेल्वे स्टेशनावरून मंदिराजवळच उतरणे. VIP पास काढून आम्ही ५ जण आत गेलो. (VIP साठी जिथून फुलांचे ताट घ्याल त्यांचीच माणसे मदत करतात.) मंदिरात कॅमेरा नेऊ नये असे म्हणतात पण मोबाइल चालतात, आता तुम्हीच काय ते समजून घ्या. मंदिरात जाण्यापूर्वी सती मातेचे मंदिर लागते. मंदिरातील गाईड ने मार्गदर्शन केल्याप्रमाणे फटाफट VIP रांगेत उभे राहिलो. जवळजवळ अर्ध्या तासाने आम्ही मंदिराच्या गाभार्‍यात पोहोचलो. आत उतरून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करावा लागतो. महादेवाचे दर्शन जोडीने घेऊन आम्ही बाहेर आलो. मंदिराच्याच आवारात अनेक लहान मंदिरे आहेत त्यातच नवग्रह मंदिर, दास मारुती मंदिर आणि इतर ऋषींची मंदिरे आहेत. फोटो काढण्याचा मोह मला इथे पण आवरला नाही. तुमच्यासाठी सर्व फोटो खालील लिंक मध्ये देत आहेच.नवग्रह मंदिरात नवग्रह स्तोत्र म्हणून दर मारुतीच्या दर्शनाला गेलो. इथला दास मारुती हा समर्थ रामदास स्वामींच्या ११ मारुतींपैकी आहे की नाही याची माहिती मला मिळाली नाही. तुमच्या जवळ असेल तर कृपया कमेंट मध्ये पोस्ट करणे.
वेळे अभावी आम्ही पटापट दर्शन घेत निघालो. मंदिराच्या बाहेर येऊनगाईला चारा खाऊ घालून थोडेसे पुण्य पोकेट मध्ये पडून घेतले.
लगेच कार मध्ये बसून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला....
मंदिराच्या परिसरातून बाहेर आलो आणि पहिले मंदिर लागले ते बडा गणेशजी.. खूप मोठी गणेशची मूर्ती बघून मला आपल्या मुंबईतील गणेशोत्सवाची आठवण झाली. त्याच मंदिरात गाईची मूर्ती,पंचमुखी मारुती आणि इतर देऊळे आहेत.
गणपतीचे दर्शन घेऊन लगेचच आम्ही राजा विक्रमादित्य मंदिरात गेलो. गाईड च्या सांगण्यांनुसार, राजाविक्रमादित्यचे सिंहासन आकाशात उडून गेले. राजाच्या दरबारात जाण्यापूर्वी खाली काळ भैरवाचे छोटे मंदिर लागते. दर्शन घेऊन वर गेलो आणि महाकाली तसेच राजाचा दरबार बघितला.
लगेच राजा विक्रमादित्यची कुलस्वामिनीहरसिद्धी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर खूप जुने व कोरीव आहे. गाभार्‍यात वरती देवदेवतांची चित्रे आहेत. त्यामागे काही कथा असतीलच पण वेळ नसल्यामुळे जास्त माहिती घेता आली नाही.
थोडं पुढे गेल्यावर शिप्रा नदी तसेच राम घाट लागतो, याच ठिकाणी कुंभमेळा भरतो. २०१६ साली याच ठिकाणीकुंभमेळा असल्यामुळे जागोजागी तयारी चालू असलेली दिसली. त्याच पुलावर थोडं पुढे गेल्यावर एक स्मशान दिसले, असे म्हणतात याच स्मशानातून ताजी राख महाकालेश्वाराला लावली जात असे.
श्रीभृर्थहारी गुंफा:
हि गुंफा काही किलोमीटर दूर शहराच्या बाहेर आहे.श्रीभृर्थहारी संन्यासाचीहि गुंफा होती. जवळजवळ ४ फुट उंचीच्या दरवाज्यातून आत जावे लागते. ज्या व्यक्तींना हायब्लडप्रेशरचा त्रास असेल त्यांनी न जाणेच योग्य कारण आत ऑक्सिजन कमी आहे तरी आत रिस्क घेऊन गेलो. दुसऱ्या गुंफेत चारधाम ला जाणारा भुयारी मार्ग आहे. असे म्हणतात या मार्गाचे दर्शनानेच चारधाम यात्रेचे पुण्य मिळते. जोडीने पुण्य परत खिशात टाकून बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला.
श्रीगढकालिका मंदिर:
अतिप्राचीन असे कालिका देवीचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेऊन निघालो. तुम्हाला वेळ असेल तर श्रीस्थिर मन  गणेश मंदिराला नक्की भेट द्या.

श्री काळ भैरव मंदिर:
कधीहि न ऐकलेला आणि न पाहिलेला असा चमत्कार या मंदिरात पाहायला मिळाला. मंदिराच्या आवारात जशी एन्ट्री केली तशी दारूची दुकाने दिसायला लागली.फूलवाल्यांकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रांड होते. अगदी देशी पासून विदेशी पर्यंत.
तेव्हा गाईड कडून अशी माहिती मिळाली की श्री कालभैरव दारू पितो.
पहिले तर विश्वासच बसला नव्हता. पण प्रत्यक्षात लोकांना देवाला दारू पाजताना आणि देव दारू पिताना पहिले. जसे आपण बशीने चहा पितो तसेच देव चांदीच्या बशीने दारू पीत होता. असे म्हणतात की दारू मंदिराच्या बाहेर कुठेच जात नाही, नमंदिराच्या खाली. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधीने मंदिराच्या आवारात खोदून पहिले होते पण सर्व निष्फळ ठरले.
चमत्कार पाहण्यासाठी या मंदिराला नक्की भेट द्या.
दर्शनघेऊन आम्ही मंगलनाथच्या दर्शनाला निघालो.वृशिक राशीस्वामी मंगळ येथे पिंडीच्या स्वरुपात विराजमान आहे. माझी रास हीच असल्याने मनापासून दर्शन घेतले. मंदिराच्याबाहेरमंगळाची आई श्री भुवनेश्वरी मातेचे (पृथ्वी) मंदिर आहे.
वेळे अभावी थोडीच ठिकाणे फिरू शकलो तरी संदीपनी आश्रम राहिलाच, कारण५.४५ ची अवंतिका एक्सप्रेस मुंबईचे रीसर्वेशन होते.
गाईड/ड्रायवर ने उज्जैन स्टेशनाच्या बाहेर सोडले, तेथेच एका हॉटेलात आम्ही जेवलो आणि स्टेशन वर दिवसभराच्या आठवणी सोबत घेऊन गाडीची वाट पाहत थांबलो.
Name and no. of driver


कसं जायचं उज्जैनला?
मुंबईहून जाणार असाल तर मुंबई सेन्ट्रल वरून अवंतिका एक्स्प्रेस आहे. संध्याकाळी ७.०५ वाजता.
इंदौर वरून बस ने माणसी ५३/- तिकीट आहे. उज्जैन वरून जर जाणार असाल तर बाहेंच रिक्शा असतात. बस असेल पण नक्की वेळ माहीत नाही.
नोट: उज्जैनला जाणार असाल तर चांगली २-३ दिवसांची सुट्टी काढून जा तरच सर्व उज्जैन घाई न करता फिरून होईल. तसेच काही किलोमीटरवर ओंकारेश्वर आहे. संपूर्ण package रु.२७००/- मध्ये उज्जैनचे ड्रायवर फिरवून आणतील.
माझा लेख कसा वाटला? कमेंट मध्ये नक्की सांगा.

धन्यवाद..
निशांत पोतदार


Saturday, December 21, 2013

गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर



गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
मा‍झ्या प्रिय वाचकांना माझा नमस्कार.

मागच्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे आज आपण  अध्यात्मिक क्षेत्र गुरुपीठाची माहिती बघूयात.

“गुरुपीठ” प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण. काही कारणांमुळे त्र्यंबकेश्वर येथे जाणे झाले होते. तेव्हा या ठिकाणी भेट देण्याचे ठरवले. पहिल्यांदाच चाललो होतो माहीत नव्हते तिथे काय आहे. अनेक प्रश्न पडले होते गुरुपीठ म्हणजे नक्की काय असेल कसे असेल नेहेमी प्रमाणे पडलेला पहिला प्रश्न म्हणजे खायला काय असेल तेथे. :) 
जसे गुरुपीठात उतरलो तसे तिथले भारून टाकणारे प्रसन्न वातावरण फील केले. फारच रेखीव आणि सुबक असे स्वामी समर्थांचे गुरुपीठ बघून मी थक्क झालो.
तिथे असणारी शिस्त मला खूप आवडली. तसेच तिथले सेवक सुद्धा हेल्पफुल होते तसेच ते प्रत्येकाला आदराने वागवत होते.

गुरुपीठ बद्दल जास्त माहिती मला http://www.dindoripranit.org या साईट वरून मिळाली, ती तुमच्या सोबत शेअर करत आहे.
गुरूप्रणालीचा विचार करता आपणास लक्षात येते की, श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच दत्त महाराजांचे कार्य दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आजही सुरु आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लोंग श्री त्र्यंबकेश्वर (भगवान शिव, भगवान बश्च्स्नदेव आणि भगवान विष्।णू हे पार्वती मातोश्रींसहित स्थापित आहेत म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे स्थान) कुशावर्त तीर्थ, ब्रम्हगिरी पर्वत, गंगामातेचे उगमस्थान, गौतम ऋषींची शेती संशोद्यन भूमी, निवृत्तीनाथांची समाधी, पिधले महाराजांची तपोभूमी अशा या पावनभूमीचे सौंदर्य वाढविणारे श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठ- त्र्यंबकेश्वर गावाच्या पूर्वेला ब्रम्हगिरीच्या उतारावरती सुमारे २१ एकर जागेत प्राचीन वटवृक्षाच्या सानिध्यात साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजंचा आशिर्वाद घेण्यासाधी येत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान हे मूळ दरबारात मध्यभागी आहे. याधिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज मयूरासनावर बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल इतकी सुंदर मूर्ती आहे. आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बवसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभव आपल्यास प्रत्ययास येईल. श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठात वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री औदुंबर सद्गुरू प.पु. पिठले महाराजांचे स्मृतीस्थान, तेजोनिद्यी सद्गुरू प.पू. मोरेदादांचे स्मृतीस्थान, यज्ञभूमी, प्रसादालय आहेत. गुरूकुलपीठाची वैशिष्ठैः
श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान
श्री गुरुपीथातील मुख्य स्थान हे मुळ दरबारातील मध्य भागी आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होइल इतकी सुन्दर मूर्ति आहे. आपण थोडा वेळ मूर्ति समोर बसून ध्यान केले तर जीवनातली अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रत्येयास येइल.
परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार
हजारों सेवेकारी एकाच वेळी समुदायिक सेवेत सहभागी होवू शकतील असा भव्य( सभा मंडपासह) दरबार असून या दरबारात प्रवेश करताच एक आगळी वेगळी अनुभूती भाविकांना मिळते. हा दरबार म्हणजे वास्तुशास्त्राचा आगळ वेगळ प्रतिक आहे. येथे स्थापित केलेल्या यंत्रानद्वारे आध्यात्मिक उर्जेची निर्मिती होत असल्याने चैतन्य पूर्ण आध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे.
तेजोनिधी सदगुरू प. पू. मोरेदादांचे स्मृति स्थान:
दरबाराच्या इशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे. सदगुरू प. पू. पिठले महाराजांनी केलेल्या तेजाच्या उपासनेतून ते तेज सदगुरू प. पू. मोरेदादांना मिळाले म्हणून त्यांना 'तेजोनिधी' असे म्हणतात. सदगुरू प. पू. मोरेदादांनी जनामानासाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडविले
सदगुरू प. पू. पिठले महाराजांचे स्मृति स्थान:
हे प्रधान दारातून प्रवेश केल्यानंतर प्रथम डाव्या बाजुला म्हणजेच मंदिराच्या आग्नेय कोपरयाकड़े आहे.तेथे आपल्याला सदगुरू प. पू. पिठले महाराजांच्या चरण पदुकांचे दर्शन होइल. सदगुरू प. पू. पिठले महाराजांनीच ह्या आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची स्थापना केली आहे
वेद अध्ययन, यज्ञभूमि
यज्ञभूमि यज्ञ, यागाविषयी समाजात असलेली निरर्थक भिती दूर करून यज्ञ, कर्म कान्डाची शास्रशुद्ध माहिती सोप्या भाषेत देण्यासाठी तसेच सर्वसामान्य सेवेकर्यांनी सत्यनारायण ते वास्तुशांती हे यज्ञविधी स्वतः कसे करावे हे प्रशिक्षण देण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. श्री गुरु पीठात भव्य यज्ञ शाळा कार्यरत आहे.
वेद अध्ययन: वेद, पुराण व अत्यंत दुर्मिळ अशा विविध ग्रंथांचा संग्रह ह्या विभागात उपलब्ध आहे.
वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी चरित्र सारामृतात वर्णन केल्याप्रमाणे भागवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदा तट यात्रेची सुरवात त्र्यम्बकेश्वर येथून केली. त्यावेळी त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षा खाली असावे, याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे. या वट वृक्षा खाली छोटेसे मंदिर आहे, अतिशय सुन्दर अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून या वटवृक्षाला अकरा प्रदक्षिणा कराव्यात. प्रत्येक प्रदक्षीणेला वटवृक्षाच्या पारंब्याना स्पर्श करून ती आपल्या कपाळला टेकावी. त्यास साक्षात् श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण स्पर्शाची अनुभूती येइल. परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे " माझे गांव दत्त नगर, वटवृक्ष, मूळ मूळ मीच मूळ स्वरूपात या वट वृक्षाच्या रुपात उभा आहे.
मुद्रणालय
या विभागात सेवा मार्गाचे सर्व साहित्य, संशोधन, ग्रंथ निर्मिती, ग्रंथ छपाई व वितरण व्यवस्था केली जाते. दरमहा प्रकाशित होणारे स्वामी सेवा मासिक अंक, दिनदर्शिका तसेच सर्व विभागांसाठी मार्गदर्शक ग्रंथ संशोधित व प्रकाशित केले जातात. आयुर्वेद विभाग आयुर्वेदास पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी वनस्पती लागवड, पंचकर्म, औषध निर्मिती, आयुर्वेद संशोधन असे प्रयत्न हा विभाग करत आहे. तसेच अद्ययावत आयुर्वेद प्रयोगशाळा कार्यरत आहे.
अन्नछ्त्र विभाग(नविन इमारत)
श्री गुरुपीठाच्या अन्नछ्त्र या मह्त्वपूर्ण विभागाचे व्याप्त व सुसज्ज स्वरुप आकार घेत आहे. अन्नछ्त्र या विभागाची सुसज्ज, आधुनिकतेने परिपूर्ण अशी इमारत असेल. त्याचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर बिल्ट अप अरीया असलेली, तळ मजला + २ मजले बांधकाम असलेली इमारत असेल. अद्ययावत, सुसज्ज किचन, तसेच कोल्ड स्टोअरेज असेल सौरऊर्जेवर अन्नाची निर्मिती करण्यात येईल. जेणे करून इंधनाची बचत होईल. अन्नधान्य साठविण्यासाठी वैज्ञानिक पध्द्तीने निर्जतुकीरण असलेले साठवण केंद्र (गोडावून) असेल. तयार झालेले अन्न दुसर्‍या मजल्यावर नेण्यासाठी विद्युत पाळणा(लिफ्ट)असेल. पहिल्या मजल्यावर एक भव्य हॉल असेल. त्या हॉल मध्ये एकाचवेळी १ हजार लोक बसून भोजनाचा आनंद घेऊ शकतील. दुसर्‍या मजल्यावर दोन हजार भाविक सेवेकरी भोजन-महाप्रसाद घेऊ शकतील आणि या सर्वांची आसन व्यवस्था स्वतंत्र असेल. स्त्री आणि पुरूष वेगवेगळे बसू शकतील. आणि अशा भव्य अन्न छत्रामध्ये भरपूर हवा आणि प्रकाश असेल. अत्त्याधुनिक तंत्राने युक्त अशी अन्नछत्र इमारत असेल. जर आपल्याला अन्नछत्रा साठी देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुकुल पीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात तसेच खालील A/C. मध्ये आपली देणगी बँकेत जमा करू शकतात, सदर देणगी आयकर माफ असेल. जर आपण बँकेत जरी A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच पावती मिळेल.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक A/C number : ५२८७२१६०००००१३ सिंडीकेट बँक, शाखा: त्र्यंबकेश्वर अधिक माहितीसाठी nitin@dindoripranit.org या इमेल वर संपर्क साधा.
गोशाळा:
हिंदू धर्मात गायीचे महत्त्व सर्वज्ञात आहे. या विभाग गायींचे पालन पोषण करून औषध निर्मितीसाठी गोमुत्राचा पुरवठा करतो.
शेती संशोधन:
प. पु. गुरुमाऊली शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन करतात. आतापर्यंत शेकडो मेळावे त्यांनी यासाठी घेतले. हा विभाग अध्यात्मिक व आधुनिक शेती यावर प्रायोगिक संशोधन करून, ग्रंथ निर्मिती करून ते ज्ञान शेतकर्याँपर्यंत पोहचवितो.
बाल संस्कार विभाग:
देशभर सेवा मर्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या बाल संस्कार कार्यासाठी आवश्यक असलेले सेवेकारी तयार करण्याचे व सुट्ट्या असलेल्या वेळी बाल संस्कार शिबिर घेण्याचे काम हां विभाग करत असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे.
वास्तु, ज्योतिष शास्त्र विभाग:
समाजातील वास्तुशास्त्र विषयक निराधार भीती घालवून वास्तु विषयक शास्त्र शुद्ध मार्गदर्शन करून सर्वांची वास्तु दोषातुन मुक्ती करणे, ज्योतिष, हस्त, अंक, शिवस्वरोदय व तत्सम शास्त्र समाजात रुजविण्यासाठी हां विभाग काम करतो. विभागांच्या प्रशिक्षण शिबिरांसाठी स्वतंत्र व्यवस्था येथे आहे

धन्यवाद,

निशांत पोतदार