सकाळीच बाईक वरून निघालो आणि गाठले ते पडघा-शहापूर हायवेवर असणारे माता वैष्णो देवी मंदिर.
कल्याण पासून अंदाजे २५ किलोमीटर वर हे मंदिर आहे.
मंदिर नवीनच आहे अंदाजे ४-५ वर्षांपूर्वी मंदिराची उभारणी झाली असावी.
मंदिरात माता वैष्णोदेवी, नवदुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, अमरनाथ गुंफा असून मंदिराच्या बाहेर थोडे लांब बाबा भैरवनाथ मंदिर आहे.
फोटोत दिल्याप्रमाणे दर्शन घ्यावे असे म्हणतात.
मंदिरात पहिले दर्शन घेतले ते साई बाबांचे (गुरु साई धाम). सकाळ असल्यामुळे दर्शन घेतल्यावर मन खूप प्रसन्न झाले.
(गुरु साई धाम)
दुसरे दर्शन झाले ते श्री हनुमंताचे. मूर्ती खूप प्रसन्न वाटत होती.
नंतर आली ती अर्ध क्वरीची गुंफा. या गुंफेतून वर जायचे असते.
अर्ध क्वारी गुंफा |
वर गेलो कि लागते ते नवदुर्गा मंदिर. मंदिरातील आईची मूर्ती खुपच लोभनीय वाटते.
दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मंदिरात गेलो.
मंदिराच्या हॉल मध्ये लिहिलेले सर्व मंत्र वाचून आम्ही पुढे निघालो.
आत गेले असता दर्शन होते ते देवीचे.
मंदिरातून बाहेर पडल्यावर दर्शन घेतले ते बाबा अमरनाथ चे
शेवटी भैरव नाथाचे दर्शन घेऊन बाईकला किक मारून आम्ही निघालो ते मानस मंदिर,शहापूरला.
आमचा पुढचा स्टोप होता मानस मंदिर, शहापूर. कल्याण पासून अंदाजे ३५ किलो मीटर दूर. मुळात मानस मंदिरम हे जैन मंदिर आहे. हे मंदिर सध्या अर्धावस्थेत आहे.
पूर्ण पणे मार्बल मध्ये बनवलेले हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते.
मानस मंदिरम् मध्ये श्री क्षेत्रपाल मंदिर आहे. ह्या मंदिराच्या मागे वडाचे झाड असून त्यावर एक नाग आहे, ज्याला हा नाग दिसतो तो नशीबवान असे म्हणतात, आणि आम्ही नशीबवान ठरलो. नागाच्या दर्शनाचा योग मला आला.
श्री क्षेत्रपाल मंदिर.
|
Nice Info.
ReplyDelete