Translate this blog

banner

Friday, May 10, 2019

महाबळेश्वर, शिवकालीन खेडेगाव , प्रतापगड माची








पाऊलवाटा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. आणि पाऊलवाटा YouTube channel नक्की सबस्क्राईब करा.

Follow us:
Paulwata facebook page: https://www.facebook.com/paaulwata/
Instagram: https://www.instagram.com/paulwata/
Twitter: https://twitter.com/paaulwata



Wednesday, January 30, 2019

बॅंगलोर पॅलेस



नमस्कार मंडळी,

मध्ये एकदा कामानिमित्त बँगलोरला जावे लागले होते तेव्हा बॅंगलोर पॅलेस ला भेट दिली होती.

बॅंगलोर पॅलेसची आतली झलक फक्त तुमच्यासाठी. व्हिडीओ थोडा मोठा आहे पण संपुर्ण पॅलेस नीट पाहता यावा म्हणून फास्ट फोरवर्ड केला नाही.




आजच्या व्ही-ब्लॉगच्या काळात सुद्धा माझा ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचकांना धन्यवाद.

पाऊलवाटा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. आणि पाऊलवाटा YouTube channel नक्की सबस्क्राईब करा.

Follow us:
Paulwata facebook page: https://www.facebook.com/paaulwata/
Instagram: https://www.instagram.com/paulwata/
Twitter: https://twitter.com/paaulwata

Tuesday, January 29, 2019

Ride for cause 26th January 2019




नमस्कार मित्रांनो,

या २६ जानेवारी २०१९ ला आमच्या रॉयल मराठा रायडर्स बुलेट ग्रुप, कल्याण ने इगतपुरी येथे असलेल्या कर्णबधीर आणि गतिमंद मुलांच्या शाळेला भेट देण्यासाठी बुलेट राईड आयोजित केली होती त्याचा हा व्हिडीओ. आजवर आपण सामान्य मुलांच्या अनेक शाळा पहिल्या असतील , भेट दिल्या असतील, पण या व्हिडीओत आपणास कर्णबधीर आणि गतिमंद मुलांची शाळा कशी चालते हे पहावयास मिळेल म्हणून हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा. कधी शक्य झाल्यास शाळेला नक्की आर्थिक मदत करा हि कळकळीची विनंती.

आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या पाऊलवाटा युट्यूब channelला नक्की subscribe करा.

नोट:
राईडला  जाताना शक्यतो riding (safety) jacket, gloves, knee guards and sunglasses असणे केव्हा हि योग्य आणि Helmet is MUST

आजच्या व्ही-ब्लॉगच्या काळात सुद्धा माझा ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचकांना धन्यवाद.

पाऊलवाटा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. आणि पाऊलवाटा YouTube channel नक्की सबस्क्राईब करा.

Follow us:
Paulwata facebook page: https://www.facebook.com/paaulwata/
Instagram: https://www.instagram.com/paulwata/
Twitter: https://twitter.com/paaulwata



धन्यवाद,

निशांत पोतदार





Tuesday, January 22, 2019

शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, कल्याण पश्चिम



नमस्कार मंडळी!
जय जिजाऊ जय शिवराय!

चार दिवसांपूर्वी राघवला बुलेटवरून कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात फेरफटका मारत होतो तेव्हा अचानक एका नुकत्याच बनलेल्या पण अर्धवट काम असलेल्या शॉपिंग मॉल कडे माझे लक्ष वळले आणि लक्ष वळण्याचे कारण होते शिवरायांचा सहा फुटी पुतळा.
सुरवातीला नीट काही समझले नाही पण आत कसले तरी प्रदर्शन असणार असे वाटलं होत म्हणून संध्याकाळी मी, माझी पत्नी आणि राघवला घेऊन तिथे जायचे ठरवले.

बाहेरच मंडपात शिवरायांचे आणि संभाजी महाराजांचे फोटो फ्रेम्स विक्रीसाठी उपलब्ध होते.

तिकीटे काढून आत प्रवेश केला आणि समोरच महाराजांची भव्य मूर्ती नजरेस पडली.  शिवरायांना वंदन करून आम्ही आत गेलो.
आत गेल्या गेल्या डाव्या बाजूला कल्याणमधील कलाकारांनी साकारलेल्या ऐतेहासिक सुंदर रांगोळ्या पहावयास मिळाल्या.




 









अनेक लहान थोर सर्व जण उत्सुकतेने ते प्रदर्शन पहावयास आले होते. वयस्कर लोक इतिहास मनातच आठवत होते आणि लहान मुले इतिहास समझून घेत घेत होते.
त्या अप्रतिम रांगोळ्या पाहताना सर्वांना फोटो काढण्याचा मोह होत होता. प्रदर्शन पाहण्यासठी अक्षरशः गर्दी लोटली होती, पण सर्वजण शिस्तीत रांगेत पुढे सरकत होते.

पुढे लागले ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने प्रशांसलेले, लिमका बुकने नोंद घेतलेले, प्रत्येकाला बालपणात घेऊन जाणारे आवर्जून पाहावे असे तांबे पितळेच्या १५०० भांड्यांचे सांस्कृतिक प्रदर्शन "आजीची भातुकली "
(आजीच्या भातुकलीचा व्हिडीओ तुम्हाला खालील युट्यूब व्हिडीओ मध्ये पाहण्यास मिळेल.)
आजीच्या भातुकलीचे संग्राहक आहेत श्री विलास नारायण करंदीकर (०२०-२४४८०२७९)

भातुकलीचा संग्रह पाहून झाल्यावर लगेच शस्त्रांचे प्रदर्शनाकडे आम्ही वळलो. सर्व प्रकारच्या तालवारी, भाले, तोफ गोळे सर्व प्रकारच्या हत्यारांची संपूर्ण माहिती तिथे देण्यात आली होती. प्रदर्शन पाहताना प्रत्येकाला नक्कीच आपल्या इतिहासाचा अभिमान वाटला असणार.
त्यापुढे होते शिवाजी महाराजांच्या काळातील गड कोटांच्या फोटोस आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या अनेक वीरांच्या वंशावालीचे प्रदर्शन.
प्रदर्शन पाहताना खरच अभिमानाने छाती भरून यायची...

प्रदर्शनात एक गोष्ट नक्कीच नाही आवडली ती म्हणजे तिथे प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या तरुण तरुणींची...

बाहेरील मंडपात असलेल्या महाराजांच्या मूर्तीसोबत फोटो काढताना तरूणांना आणि तरुणींना याचे सुद्धा भान नव्हते कि ते ज्यांच्या सोबत फोटो काढत आहेत ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हजारो कोटी लोकांचे प्रेरणास्थान आहेत. आज ज्यांच्यामुळे आपण आहोत असे थोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यासोबत उभे राहताना बिनधास्तपणे पायात चप्पल, शूज घालून उभे होते. हे पाहताना खुप वाईट वाटत होते. शेवटी न राहून एका ग्रुप ला मी पकडलेच आणि नीट समजावून सांगितले, त्यावर त्यांनी त्यांची चुकी कबुल केली.

मला तरूणांना हेच सांगायचे आहे कि आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आदर आपणच नाही केला तर दुसऱ्या कोणी अपमान केल्यास आपल्याला त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. याचे भान असावे.

धन्यवाद..!

आजच्या व्ही-ब्लॉगच्या काळात सुद्धा माझा ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचकांना धन्यवाद.

पाऊलवाटा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाऊलवाटा YouTube channel नक्की सबस्क्राईब करा.


Follow us:
Paulwata facebook page: https://www.facebook.com/paaulwata/
Instagram: https://www.instagram.com/paulwata/
Twitter: https://twitter.com/paaulwata





Tuesday, January 15, 2019

माळशेज घाट बुलेट राईड.. पुन्हा एकदा..



नमस्कार वाचकांनो...

काही कारणांमुळे ब्लॉग पोस्ट लिहायला उशीर झाला म्हणुन आता लिहीत आहे.

2018 चा पावसाळा नुकताच संपत आला होता आणि वातावरण फारच छान झाले होते म्हणुन एखादी राईड तर बनते असा विचार आम्ही ऑफिस मध्यला मित्रांनी केला आणि स्पॉट ठरवला माळशेज घाट.
पुन्हा थोडे डिस्कस करून ठरवले one day ride मारायची कल्याण> माळशेज घाट> गणेश खिंड> शिवनेरी> ओझर मार्गे पुन्हा कल्याण.

प्लॅनिंग झाले आणि दिवस ठरला.
रविवारी पहाटे 3 वाजल्यापासून आमचे एकमेकांना फोन सुरु झाले. नेमका शनिवारी मध्यरात्री धो धो पाऊस कोसळत होता आणि मनिष विरार वरून येणार होता. एक विचार मनात पण येऊन गेला की राईड पुढे ढकलावी, पण एकदा ठरवले म्हणजे ठरवले.
सकाळी 6 वाजता मी आणि अजय ने कल्याणच्या आधारवाडी चौकात चहाच्या टपरीवर भेटायचं ठरवलं होतं. मनिष विरारहून येईपर्यंत मस्त फक्कड चहा मारला. राईडचा मस्त मूड बनला होता.

काही वेळाने म्हणजे जवळ जवळ एक तासाने मनिष आधारवाडी चौकात आला. नेहेमी प्रमाणे थोडे फोटो सेशन करून, आम्ही निघालो. 😎📷








कल्याणच्या बिर्ला कॉलेजजवळच्या रोशन पेट्रोल पंप वर आम्ही दोघांनी बुलेटच्या टाक्या फुल केल्या.

आमचा पुढचा स्टॉप होता टोकावडे गावाजवळील हॉटेल प्रांजली. अजयने सुचवलेल्या या हॉटेल मध्ये मिसळ छान मिळते म्हणुन आम्ही पण इथेच नस्त्याला थांबण्याचा आग्रह धरला.

सरळ गावापासून पुढे वळणदार रोड लागतो, मला नेहमीचाच रस्ता  असल्याने गाडी चालवताना बिलकुल अनपेक्षित झटके 😁 मिळाले नाहीत.

हॉटेल प्रांजली ला आम्ही मस्त मिसळ पाव आणि चहा मारला. फ्रेश होऊन पुढचा टप्पा लवकर पार करायचा होता म्हणून जास्त ठिकाणी ब्रेक न घेता आम्ही बाईक मारत होतो.

नाणेघाट खिंडी जवळ येताच इतिहासातल्या छत्रपतींच्या
 काही घटना आठवल्या. त्याच आठवणी मनात ठेऊन पुढे वळणदार रस्त्यावरून आमचे घोडे पळवत होतो.

शेवटी माळशेज घाट सुरु झाला. बाजूने ट्रॅक्स जोरात जात असल्याने  थोडे सावधपणे गाडी चालवत होतो.
पहिला स्पॉट लागला आणि आम्ही थांबून फोटो शेशन सुरु केले. निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही पुढच्या स्पॉट वर निघालो.

सकाळी जवळ जवळ 9.30 वाजता अपेक्षेपेक्षा लवकर आम्ही माळशेज घाटात एमटीडीसी रिसॉर्ट जवळ पोहोचलो होतो.

आता सर्व पॉइंट्स पाहून झाले होते म्हणुन शिवनेरी ला कोणत्या मार्गे जायचे ते ठरवून बाईकस् ला किक मारली.

छत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीवर मी पहिल्यांदाच जाणार होतो म्हणून गडा विषयी फार उत्सुकता होती. अखेर गणेश खिंडीतून आम्ही शिवनेरीवर जायला निघालो.



















जवळ जवळ दहा ते बारा किलोमीटर चा रस्ता खडबडीत होता,तसेच रोड गावा बाहेरून असल्याने एकही गॅरेज लागले नाही. जर तुम्ही सुद्धा यामार्गे शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर तुमची कार किंवा बाईक ठीक आहे ना याची खात्री करून घ्या.

अखेर आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. बुलेट्स किल्ल्याखाली पार्क करून किल्यावर जाण्याचा विचार केला पण वेळ कमी असल्याने खालूनच महाराष्ट्रातील मावळ्यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्या पावन झालेल्या गडाचे दर्शन घेऊन आणि महाराजांची माफी मागून आम्ही पुढच्या वाटेला लागलो.

ओझरचा गणपती:
ओझर शिवनेरी पासून खुप जवळ आहे. अष्टवनायकांपैकी ओझर हे गणपतीचे एक स्थान म्हणुन प्रसिद्ध ठिकाण आहे.
पितृपक्षात गेल्याने आम्हाला खूपच कमी गर्दी मिळाली. त्यामुळे गणपतीचे दर्शन एकदम निवांत आणि बराच वेळ घेता आले. 
आम्ही तिघांनी दर्शन घेऊन थोडे फोटोज् घेतले. गरम झाल्याने मंदिराच्या सभामंडपात जरावेळ बसुन आराम केला. बराच वेळ मोबाईल ला नेटवर्क नव्हते, त्यामुळे मंदिरात बसुन पटापट घरच्यांना फोन करून आम्ही खुशाली कळवली.
गणपती बाप्पाला पुन्हा एकदा नमस्कार करून सर्वांचे कल्याण, सुखशांती चिंतून आम्ही निघालो. 
दुपार झाली होती आणि भुक पण फार लागली होती. म्हणुन हायवे ला एका प्रसिद्ध धाब्यावर मस्त चिकन रस्सा आणि भातावर ताव मारला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
रस्ता फारच स्वच्छ आणि बिना खड्यांचा होता त्यामुळे गाडी राईड करताना फार मजा येत होती. दुपारी 3 वाजता आम्ही जुन्नर वरून निघालो. इतके प्रसन आणि ताजे वातावरण आपल्या मुंबईत क्वचितच पाहायला मिळते.

माळशेज घाट उतरून खाली आल्यावर मुरबाड जवळ एका हॉटेलमध्ये आम्ही चहा घेतला आणि पुन्हा कुठे राईड मारायची यावर विचार सुरू केला.

कल्याणच्या खडकपाड्यावर बरोबर संध्याकाळी सहा वाजता आम्ही पोहोचलो. मनिष ला पुढे विरार ला लवकरात लवकर पोहोचायचे होते म्हणुन त्याचा जास्त वेळ न घेता आम्ही त्याला जाऊ दिले. पुढे जवळजवळ 9.30 ला तो घरी पोहोचला.

शिवनेरीवर जायचे कसे?
कल्याण वरून जाणार असाल तर बिर्ला कॉलेज मार्गे, शहाड> मुरबाड>माळशेज मार्गे जावे.

खर्च किती आला?
प्रत्येकी अंदाजे ₹ 300-350/-

नोट: 
राईडला  जाताना शक्यतो riding (safety) jacket, gloves, knee guards and sunglasses असणे केव्हा हि योग्य आणि Helmet is MUST

निशांत 
अजय














मनिष


आजच्या व्ही-ब्लॉगच्या काळात सुद्धा माझा ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचकांना धन्यवाद.

पाऊलवाटा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. आणि पाऊलवाटा YouTube channel नक्की सबस्क्राईब करा.

Follow us:
Paulwata facebook page: https://www.facebook.com/paaulwata/
Instagram: https://www.instagram.com/paulwata/

Twitter: https://twitter.com/paaulwata

धन्यवाद!

निशांत पोतदार.

Wednesday, May 16, 2018

इतक्यात आलेला एक अनुभव


१६ मे २०१८

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

आज नुकताच आलेला अनुभव शेअर करत आहे.

Image result for tyre pressure checking near highway india
Image courtesy: गुगल्या भाऊ 















आपल्यापैकी बरेच जण दररोज घर ते ऑफिस दुचाकी किंवा चार चाकीवरून प्रवास करत असतात आणि

सध्या उन्हाळा असल्यामुळे बरेच दा टायरचे प्रेशर कमी होते आणि हिवाळ्यात वाढते. कधी कधी आपण रस्त्याजवळ हायवेला लागून असलेल्या छोट्या ग्यरेज मध्ये हवा भरून घेण्यासाठी थांबतो आणि त्याच वेळेस आपल्याला सांगितले जाते कि टायर पंक्चर आहे.

मी दररोज गेली ४ वर्ष बुलेटने ऑफिसला जातो आणि नेहेमीच हायवे वर हवा भरून घेतो. काही दिवसांपूर्वी  मी नेहेमीप्रमाणे हायवे वर हवा भरून घेतली आणि अचानक मेकॅनिक ने सांगितले पुढच्या टायर मध्ये हवा कमी आहे, खूपच उन होत आणि मला ऑफिसला जायला उशीर होत होता, त्यात त्याच्यात थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला म्हणून त्याला नाकारून मी पुढे निघालो. ऑफिस सुटल्यावर पुन्हा टायर दाबून पहिला असता हवा जरासुद्धा कमी नव्हती, त्यानंतर मी जव्हारची सोलो राईड पण मारली.

पुन्हा गेल्या सोमवारी हवा भरायला हायवेला दुसऱ्या गरेज मध्ये थांबलो असता त्याने सुद्धा मला हेच सांगितले कि पुढच्या टायर मध्ये हवा भरून काही फायदा नाही, टायर पंक्चर आहे. बाकी यावेळेस मला थोडे खरे वाटले कारण राईड मारून आल्यामुळे कदाचित कुठेतरी गाडी पंक्चर झाली असावी.
माकॅनिक ने मला टायर दाबून दाखवून पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि मी तयार झालो. यावेळेस सुद्धा टायर बदलायला वेळ लागेल म्हणून मी निघालो.
गाडीचे RSA (Road Side Assistance) असल्याने ऑफिस ला येऊन माकॅनिक ला बोलावून घेतले. त्याने चेक करून सांगितले कि टायर बिलकुल  पंक्चर नाही आहे.

मंडळी , सांगायचा हेतू हाच कि ज्यावेळेस तुम्ही हवा भरायला कुठे थांबता तर लगेच कुणावर विश्वास ठेऊ नका. सध्या प्रत्येक जण कमी मेहनत घेऊन श्रीमंत व्हयला बघतोय जे साफ चुकीचे आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अश्या ट्रापमध्ये सापडू नये हीच इच्छा.

धन्यवाद,

निशांत पोतदार

ब्लॉगपोस्ट कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग शेअर करा.
आपले फेसबुक पेजलाईक करायला विसरू नका:  https://www.facebook.com/paaulwata
YouTube वर पण Subscribe करा: https://www.youtube.com/channel/UC3GalhgUi_5i_bWBFj7odzA

Saturday, January 20, 2018

महाकाय श्री हनुमान - नांदुरा, महाराष्ट्र




माझ्या प्रिय सभासदांनो पुन्हा एकदा नमस्कार!




काही कारणांमुळे ब्लॉग लिहायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
मागच्या महिन्यात काही कामासाठी खामगावला गेलो होतो, तेव्हाच ठरवले कि नंदुर्याला जायचे.

नांदुरा हे गाव इतके प्रचलित नाहीये पण हेच गाव एका खास गोष्टीसाठी फार प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथला मारुती. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके? आमच्या गावात / शहरात नाही का मारुती? नक्कीच आहे पण मंडळी, इतका मोठ्ठा नक्कीच नाही जितका इथे आहे.

होय मित्रांनो! इथे जी हनुमानाची मूर्ती आहे ती तब्बल १०८ फुट उंच आहे जी विश्वातली सर्वात उंच मुर्ती आहे आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली गेली आहे.. अनेक वर्ष मला इथे भेट देण्याचा योग येत नव्हता तो अखेर आला...




शेवटी ठरले, मग मी आणि माझा मेहुणा गौरव आम्ही त्याच्या गाडीवर निघालो.
खामगाव पासून जवळ जवळ अर्धा तासावर नांदुरा आहे आणि शेगाववरून सुद्धा तितकेच अंतर असावे.

जसे आम्ही नंदुर्याला येत होतो तसतशी हनुमानाची मुर्ती मोठी होत जाताना दिसली जसे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे वर्णन केले आहे.. "वाढता वाढता जाये ; भेदिले सुर्यमंडळा!" आणि "भीमरूपी महारुद्रा!"

मारुतीची प्रशस्त मुर्ती डोळ्यात मावत नव्हती. खरोखरच स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणेच तो भीमरूपी महारुद्र होता.. जवळ जाताच आपण किती ठेंगणे आहोत याचा प्रत्यय येतो.





महाकाय मारुतीची माहिती:

महावीर मारुतीची अनेक मंदिरे भारतात आहेत पण इथे विश्वातली सर्वात उंच मुर्ती विराजमान आहे.

 श्रद्धा का प्रतिरूप है जो,
संकल्प जहां न अधुरा है|
बसते है विराट हनुमान जहां,
वह भाग्यशाली ग्राम नांदुराहै||

देशाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा गाव आहे. गावाच्या पश्चिम दिशेला भारतातली सगळ्यात उंच १०८ फुट उंच महाकाय  मारुतीची मुर्ती आहे.मूर्तीच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम २१ ऑक्टोबर १९९९ नंतर करण्यात आला. १७ फुट पाया  खोदून त्यावर ४२ X ४६ फुट आणि ८ फुट उंच चबुतरा बनवून त्यावर मूर्तीचे निर्माण कार्य सुरु केले गेले. पाया पासून ते मूर्तीच्या डोक्यापर्यंत उंची १०८ फुट आहे.


मूर्तीच्या निर्माण कार्यात ३७५ ट्रक सिमेंट, ४०० क्विंटल लोखंड वापरले गेले आहे. मुर्ती मजबुत बनवण्यासाठी २५ mm च्या ८० सळया दोन्ही पायांतून पुर्ण शरीरात टाकल्या आहेत.मुर्ती प्रत्येक तासाला PH 350 KM वेगाचे वादळ आणि ४-५ रीस्टेल स्केल चा भूकंप सहन करू शकते हे मूर्तीचे खास वैशिष्ट आहे.
जवळ जवळ दीडवर्षाच्या  कालावधीनंतर मुर्ती पुर्ण तयार झाली.

मूर्तीची छाती -७० फुट 
पायाचा तळवा -३२ फुट
गदेची लांबी -३४ फुट
मुकुटाची लांबी -१५ फुट 


मारुतीचे दर्शन घेतले आणि अगदी जवळ जाऊन मुर्ती पहिली. लवकरच मूर्तीचा जीर्णोद्धार होणार आहे असे समझले. मूर्तीच रंगकाम आणि डागडुजी सुरु होणार असुन, मला मिळालेल्यामाहिती प्रमाणे येत्या सहा महिन्यांत पुर्ण होऊ शकते, तेव्हा जून २०१८ नंतर नक्की इथे भेट द्या.

दर्शन झाले, फोटो काढले आणि मागे एक सुंदर मंदिर दिसले, तेव्हा समझले कि ते तिरुपती बालाजीचे आहे. मंदिरात राधा कृष्णाच्या लीला करताना अनेक सुंदर मुर्त्याआहेत तसेच  गणपती, गरुड यांची सुद्धा मंदिरे आत आहेत.  सभा मंडप तर फारच छान आहे. मंदिराला आणि मूर्त्यांना रंग देणाऱ्या कलाकारांचे विशेष कौतुक!
त्यांनी मंदिरातल्या प्रत्येक मूर्तीत प्राण ओतून रंग रेखाटले आहेत आणि त्याची प्रचीती आपण स्वतः ज्यावेळेस मंदिराला भेट देऊ तेव्हाच कळेल.

मंदिरात, संस्थाना मार्फत अनेक सेवा देण्यात येतात जसे, बालाजी मंदिराखालीच गरिबांसाठी एक हॉस्पिटल आहे जिथे मोफत डोळ्यांच्या शत्रक्रिया करण्यात येतात.
मंदिराचे काम अजून चालू आहे , तरी जून २०१८ च्या नंतर भेट दिल्यास तुम्हाला फायदा होईल.

नांदुरा कसे जायचे?

मुम्बई वरून येणार असाल तर विधर्ब एक्स्प्रेस किंवा अमरावती ने नांदुरा ला उतरून जाऊ शकता किंवा शेगाव वरून सुद्धा बस , रिक्षा आहेत.

खाली दिलेल्या लिंक वर फोटो पहावयास मिळतील.

महाकाय श्री हनुमान, नांदुरा 



ब्लॉग कसा वाटला? नक्की सांगा आणि पाऊलवाटा YouTube Channel Subscribe नक्की करा.




मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम |
वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये....

|| जय श्री राम जय हनुमान ||


Thursday, January 18, 2018

लवकरच येतोय नांदुरा महावीर हनुमानाची माहिती घेऊन....



लवकरच येतोय नांदुरा महावीर हनुमानाची माहिती घेऊन.... 

तोवर आपल्या पाऊलवाटा YouTube channel ला subscribe नक्की करा.....

==> पाऊलवाटा YouTube

Wednesday, December 27, 2017

माळशेज घाट बाईक राईड


नमस्कार,

आज बऱ्याच दिवसांनंतर काहीतरी घेऊन येतोय....

असेच एकदा विचार करत होतो, कि जिथे मी राहतो तिथल्या लोकांसोबत एकदा बाईक राईड करायची.
दिवस पण थंडीचे आहेत आणि याच दिवसात सकाळीच बाईक रपेट मारायला मज्जा येईल.
बिल्डिंगच्या ग्रुप वर टाकले आणि काही जण यायला तय्यार पण झाले.

दिवस ठरला, सकाळी ६ वाजता बायकर्सना माळशेज घाट मार्गाच्या आणि इतर सूचना देऊन आम्ही निघालो.

पहाटेची बोचरी थंड हवा आणि समोर दिसणारा मोकळा रस्ता आम्हाला माळशेज घाटात जायचा उत्साह देत होता.
सकाळच्या वेळेस आणि रस्ता सामसूम असल्यावर बुलेट चालवायची मज्जा काही औरच!

मुरबाडच्या पुढे टोकावडे गावाजवळ एका ठिकाणी थांबून रावण साहेबांनी सोबत आणलेल्या इडली चटणीवर ताव मारला.

थोडे फोटो सेशन करून आम्ही पुढे निघालो. निघतानाच ठरवून निघालेलो कि २ तासात माळशेज घाटात पोहोचायचेच पण काही तांत्रिक अडचणींमुळे जमले नाही.



जस जसे पुढे जात होतो तसा वळणदार आणि दोन्ही बाजूनी झाडी असलेला रोड लागत होता. मधेच एखादे खेडेगाव लागायचे. तिथे खेळणारी लहान मुले पाहून मला माझे बालपण आठवले. जेव्हा मामाच्या गावाला जायचो अशीच मस्ती करायचो मित्रांसोबत.

आणि शेवटी घाटाच्या पायथ्याशी आलो. तिथेच ठरवले कि कोणालाच मागे ठेवायचे नाही आणि कोणीही जास्त पुढे जायचे नाही कारण "अति घाई ; संकटात नेई!" 😀😀

येणाऱ्या प्रत्येक स्पॉटवर आम्ही फोटो काढत चाललो होतो. आमचे शेवटचे ठिकाण होते MTDC रेसोर्ट, माळशेज घाट.

आणि शेवटी आम्ही माळशेज घाट MTDC रेसोर्ट ला पोहोचलो.

येताना आम्ही टीटवाळा जवळ एका धाब्यावर जेवलो आणि संध्याकाळीअंदाजे ५ वाजता परत घरी पोहोचलो.










माळशेज घाटात जायचा रोड एकदम सरळ आहे. कल्याणवरून जाणार असाल तर शहाड मार्गे जावे.
कल्याण ते माळशेज घाट हे अंतर १०० किलो मीटर आहे.

खाली फोटो ची लिंक देत आहे.
Malshej Ghat Ride

ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझ्या YouTube channel ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद,
निशांत पोतदार

YouTube: पाउलवाटा
Facebook: https://www.facebook.com/paaulwata/








Monday, February 27, 2017

असेच काहीतरी वेगळे .... बघा आवडतेय का ...


Tagg Inferno Bluetooth Headphones
आजच घरी आलेत... Rs. २०९९ ला विकत घेतलेत माझ्यासाठी ...

माझ्याकडून माझ्यासाठी वाढदिवसाचे advance मध्ये गिफ्ट :P :)

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


थोडं उशिराच... 

पण मराठी भाषा दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

आपली मराठी भाषा अशीच चिरायू होवो...

Saturday, March 26, 2016

Royal Enfield Ride to Palghar



नमस्कार..

१५ डिसेंबर २०१५ रोजी मी SR Motors उल्हासनगर येथून नवी कोरी क्लासिक ३५० सीसी बुलेट विकत घेतली होती तेव्हा कळाले कि SR Motors bullet rides पण काढतात. पण मला जायचा योग येत नव्हता, शेवटी तिथेच काम करणारे श्री सुहास मोरे यांनी मला पालघर राईड बद्दल सांगितले तसेच SR Motors च्या group मध्ये add केले.  जवळ जवळ ३० जणांनी confirmation दिले.

ठरल्याप्रमाणे पहाटे ५.४५ ला showroom च्या बाहेर भेटायचे ठरले. एकेक करून सर्वजण जमले. काही वेळात ठाणे घोडबंदर मार्गे पालघर ला जायला आम्ही निघालो.

माझी हि पहिलीच बुलेट राईड. सुरुवात चांगली झाली. रोहित प्रत्येकाला गाडीचे पेपर जवळ असण्याच्या सूचना देत होता. 
एका मागे एक येणाऱ्या बुलेट पाहून लोकं आमच्याकडे पाहत होती. कुठेतरी मला सुद्धा जाणवले कि काही काळापूर्वी मी पण त्यांच्यातलाच एक होतो. असा ग्रुप जाताना पहिला कि वाटायचे मला सुद्धा जायला आवडेल पण गाडी नव्हती....

पुढे घोडबंदर रोड वर उतरून rout set केला. आतिश ने सर्वांना राईड instructions दिल्या.
काहीवेळ तिथे थांबून फोटो काढले, सकाळचे फ्रेश वातावरण आणि बुलेट राईड... क्या combination.. 
मज्जा आली. पुढचा आमचा स्टोप होता हॉटेल फौंटन, ठाणे.

हॉटेल ऐन मोक्याच्या जागेवर होते. फटाफट सर्वांनी नाष्टा ओर्डर केला. अर्धातास थांबून आम्ही सर्व निघालो. एका सरळ रेषेत उभ्या बुलेट पाहून लोकांच्या नजरा गाड्यांकडे वळल्या आणि त्यांना पण आमच्या गाड्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. 
थोडावेळ फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

या राईड मध्ये मला सर्वात जास्त आवडले ती शिस्त.. येणारा प्रत्येकजण हा राईडर होता तरी सुद्धा सरळ एका लाईनीत गाडी चालवत होते. त्यात ३ लीड होते एक सर्वात पुढे एक मध्ये आणि एक शेवटी...

रोड मस्तच होता.. एकदम सुस्साट तरी सुद्धा सर्वजण जवळजवळ एकाच स्पीड मध्ये गाडी चालवत होते. राईड चे आणखी एक गोष्ट मी mark केली ती म्हणजे भले उजाडले असेल तरीसुद्धा सर्वांचे headlamp चालू होते. त्यामागे सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे मागून येणारा आपला राईडर mirror मध्ये दिसला पाहिजे आणि group member सहजासहजी ओळखता येतो.

एकमेकांचे cooperation and support was mind-blowing.   

एक एक तासांचे break घेत आम्ही पालघर ला चाललो होतो. मधेच वळणदार रोड तर मधेच सरळ रस्ता येत होता. प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव येत होता. मधेच एक घाट लागला तो उतरलो कि आपण सफाळे ला निघतो.
पुढे केळवे रोड रेल्वे स्टेशन लागले. बाजूच्या रोड ने सरळ गावातून केळवे बिच वर जायचा रोड आहे. गावातून जाताना जुने दिवस आठवले जेव्हा मामा/माउशीच्या घरी जायचो.

आणि शेवटी आम्ही destination गाठले. सकाळचे १० वाजले होते. मस्त सोसाट्याचा वारा पण सुटला होता त्यामुळे लांबच्या प्रवासाचा थकवा बिल्कुल जाणवला नाही. 

भरपूर फोटो काढले नंतर बिचवर फिरून परतीच्या प्रवासाला निघालो. मधेच एका छान रेसोर्टमध्ये जेवायला उतरलो.
जेवतानाच अतिश आणि सुरेश राव यांनी पुढची ट्रीप फायनल केली. ३ दिवस तारकर्ली, कोकण १००० किमी राईड. इथे जायचा मी १००% प्रयत्न करणार. :) :)  

जेवून दुपारी ३.३० ला आम्ही निघालो आणि direct फौंटन हॉटेललाच भेटायचे ठरले. रस्ता जवळजवळ माहितीच होता म्हणून प्रत्येकजण सुसाट पण शिस्तीत जात होता.

संध्याकाळी ६ वाजता हॉटेलमध्ये चहा/ कॉफी घेऊन सगळ्यांना हाय बाय करत परतीच्या प्रवासाला निघालो.

तुम्ही इंटरेस्टेड आहात बुलेट राईडसाठी? मग SR Motors उल्हासनगर ला भेट द्या तिथे अतिश (Manager) किंवा सुहास मोरे भेटतील. 

नोट: 
1.राईडला  जाताना शक्यतो riding (safety) jacket, gloves, knee guards and sunglasses असणे केव्हा हि योग्य आणि Helmet is MUST.
2. आगाऊ riders ला इथे पुन्हा बोलावले जात नाही. :)
 

ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की कळवा.

धन्यवाद,
निशांत पोतदार
www.fb.com/nishantpotdar
Instagram: @thenishantpotdar
पाऊलवाटा पेज लाईक करायला विसरू नका: www.fb.com/paaulwata

Have a Happy and Safe riding..




 

Tuesday, March 1, 2016

दिंडीगड शिवमंदिर


नमस्कार...
पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनंतर एक छोटा ट्रेक घेऊन आलोय.

बरेच दिवस झाले होते कुठे मागच्या पावसाळ्यात कुठे तरी जायचे होते पण जाणार कुठे?  Option सुचत नव्हता.. एके दिवशी बाल्कनीत उभा राहून असेच दूर पाहत असताना मला एक मंदिर दिसले .. उंच आणि हिरव्यागार डोंगरावर एक टूमदार असे छोटे देऊळ होत ते. बऱ्याचवेळा ठाणे नाशिक हायवेवरून दिसायचे पण कसे जायचे ते माहित नव्हते.
 शेवटी बाल्कनीत उभा उभा राहुन मोबाईलच्या होकायंत्राचा (Compass) चा वापर करून location शोधले. पुढे google map वापरून रस्ता मिळवला...
त्या मंदिराचे नाव होते दिन्डीगड शिवमंदिर..

बस्स... ठरले.. मित्राला विचारले आणि तो हि हसत हसत हो म्हणाला.. दिवस ठरला..
९ ऑगस्ट २०१५

आदल्या दिवशी रात्री सगळी तय्यारी करून ठेवली होती..  map पण download करून ठेवला होता म्हणजे ऐन वेळेवर पंचाईत नको..

ठरल्या प्रमाणे सकाळी विजयला वायले नगर, कल्याण वरून pick केले आणि दुर्गाडी मार्गे आम्ही मुंबई-नाशिक हायवे ला आलो. पुढे सरळ भिवंडी रोड पकडून सोनाळे गावात गेलो... रस्ता थोडा खराब होता पण इंग्रजीत एक म्हण आहे ना.. "Where there is a will there is a way.."  डोंगराच्या पायथ्याशी MIDC area  असल्याने थोडी घाण आहे. केमिकल आणि रस्त्यांवर सांडलेल्या ग्रीस, डीजेल मुळे रस्ते थोडे निसरडे होते आणि पाऊस
असल्याने चिखल हि होता त्यामुळे बाईक नीट चढत नव्हती. शेवटी दुसऱ्याच एका रस्त्याने जाऊन गाडी डोंगराच्या पायथ्याशी उभी करून पुढे चालत मार्गक्रमण केले.

पावसाळा असल्याने वातावरण छानच होते. दूर पावसाने भरलेले काळे ढग दिसत होते.
मंदिराच्या दिशेने चालणे सुरु केले कि पहिले लागतो तो ह.भ.प. चिंतामणी महाराज पाटील यांचा आश्रम आणि गोशाळा.
मंदिराच्या दिशेने जाताना थोडे

गोंधळल्यासारखे होऊ शकते कारण थोडे पुढे आल्यावर दोन फाटे फुटतात, आपण डाव्या दिशेने चालणे सुरु ठेवा... थोडे वर आलो आणि तहान लागली आणि ऊन पडल्यामुळे विजय थकला :)  थोडे फोटो काढून त्याला boost केला.


जस जसे वर जातो तसे आपण कोकणात आल्याचा भास होतो.. आणि का नाही होणार वातावरणच तसे होते. गर्द हिरवी झाडी, बाजूला छोटी का होई ना पण दरी होती. मधेच वारा सुटायचा.. थोडे पुढे सरकलो आणि म्याव म्याव असा आवाज येऊ लागला... तेव्हा बाजूने जाणाऱ्या साधू बाबा ला विचारले तेव्हा तिथे मोर असल्याचे आम्हाला कळाले..

video shoot करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.. पण तेव्हा मोर काही ओरडले नाहीत.  पूर्ण शांतता असल्यास मोर ओरडल्याचा आवाज नक्की येतो. आम्ही ऐकला पण रेकॉर्ड करायला नाही मिळाला.
असो..

 वाटेत जाताना शंकराचे एक छोटे मंदिर लागते. तिथून डाव्या बाजूने पुढे जायचे.
थोडी उंच आणि निसरडी चढण आहे.. हि चढण एकदा पार केली कि आपण जवळजवळ मंदिराच्या पायथ्याशीच असतो.

नेहेमीप्रमाणे फोटो काढत आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलो..

मंदिरच्या बाहेर सभा मंडप बनवलेला आहे, थोडे काम बाकी आहे. आजूबाजूला संपूर्णपणे हिरवा निसर्ग आहे.  भगवान शंकराचे मंदिर हि साधेच आहे.
दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराबाहेरचे वातावरण अचानक बदलले... सगळीकडे काळे ढग पसरले आणि जे मी काही वर्ष मिस केले ते मला अनुभवायला मिळाले. मंदिराच्या सभामंडपात चारी बाजूने ढग आत यायला लागले.. जणू काही स्वर्गात असल्याचा भास होत होता.  थोड्यावेळात पाउस सुरु झाला आणि हा निसर्गाचा बदल मला अनुभवता पण आला आणि रेकॉर्ड सुधा करता आला. खास माझ्या वाचकांसाठी व्हिडीओ शेअर करत आहे.


हे दोन्ही व्हिडीओ नक्की बघा.
दर्शन झाल्यावर विजय ने घरून आणलेली ईडली आणि सांभारावर ताव मारला.
वातावरणात असलेला गारवा आणि तिथला निसर्ग सोडून आम्हाला पुन्हा खाली यायची इच्छा होत नव्हती पण काय करणार.. ये जालीम भुख ... आणि रविवार होता..  :D लवकर निघायचे होते.. कारण पुढचा प्लान होता कल्याण च्या बाहेर असलेल्या नार्याच्या धाभ्यावर मिळणारी चिकन हंडी आणि गरमगरम भाकरी...


म्हणून भर पावसात बाईक वरून धमाल करत बापगाव गाठले.. आणि मग काय.... आम्ही दोघे आणि चिकन हंडी...

तोंडाला पाणी सुटले ना??

दिन्डीगड ला कसे जायचे?

ठाण्यावरून येणार असाल तर मुंबई नाशिक हायवे वरून भिवंडीला वळणे तिथून थोडेच पुढे सोनाळे गावात रस्ता जातो. कोणीही दिंडीगड मंदिराचा पत्ता सांगेल.
पावसाळ्यात जात असाल तर सांभाळून राहा कारण जंगल असल्यामुळे साप असू शकतात.

ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा.



Monday, July 6, 2015

सगुणा बाग





बर्‍याच दिवसापासून कुठेतरी जायचं होतं पण प्लान बनत नव्हता आणि वेळ हि मिळत नव्हता.. म्हणून लगेच या आठवड्यात प्लान बनवला तो पण मी नाही... या वेळेस आमच्या सौ ने.. :D आणि स्पाॅट ठरवला कर्जत जवळचा सगुणा बाग.   


येथे जाण्यासाठी २ दिवस आधी बुकिंग करावं लागते. तसं बुकिंग करून या शनिवारी आम्ही गेलो होतो. One day picnic साठी सकाळी ९ ते ५ हि वेळ आहे. 


सकाळच्या खोपोली ट्रेनने आम्ही नेरळ ला उतरलो.  नेरळ पश्चिम ला बाहेर पडला असता बस स्टैंड वरून स्पेशल रिक्शा मिळतात. जाताना १०० आणि परतताना १३० हे दर ठरलेलेच आहेत त्यामूळे रिक्शाचालकांशी हुज्जत घालण्यास वेळ घालवू नका. 

जवळजवळ १० मिनिटांत आम्ही सगुणा बागेत आलो. आत entry केल्या केल्या गावाला आल्याचा feel येतो. Reception counter वरची व्यक्ति आपले निट स्वागत करुन व्यवस्थित माहिती देते. 

जवळच बॅग ठेवण्यासाठी लाॅकर ची व्यवस्था केली आहे. १०० deposit देऊन तुम्ही लाॅकर घेऊ शकता. लगेच फ्रेश होऊन breakfast कडे मोर्चा वळवला. मस्तपैकी पोहे आणि इडली सांबार वर ताव मारून माहितीसाठी गाईड घेतला आणि आम्ही फिरायला निघालो. 





थोडा अबोला असलेला आमचा गाइड रोहन हळुहळु गप्पा मारण्यात आणि माहिती देण्यात चांगलाच रमला.... अनेक प्रकारच्या झाडांची आणि वनस्पतींची माहिती द्यायला सुरुवात केली. जसजसे पुढे जात होतो तसतशी न पाहिलेली फुले, वनस्पति झाडे दिसू लागली. 


जवळजवळ ५० एकरच्या परिसरात सगुणा बाग पसरली आहे. Explore करताना आणि फोटो काढताना मजा येत होती. 


मधेच बैलगाडी वरून रपेट मारली.. तेव्हा जूने दिवस आठवले... लहानपणी ऊन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हां गावाला जायचो आणि फुकटात कुणाच्याही बैलगाडीत बसून गाव हुंदडायचो. 

फिरत फिरत पुन्हा मेन गेट जवळ आलो तेथे मस्तपैकी थंडगार कोकम सरबताची व्यवस्था केली होती.  सरबत पिउन आम्ही पुढे निघलो…
मल्लखांब चे practical बघून आम्हाला गाइड ने एका तलावाजवळ थांबण्यास सांगितले जिथे मोठे मासे दाखवण्याचा कार्यक्रम होणार होता. थोड्याच वेळात काही मुलांनी पाण्यात उतरून अनेक जातींचे मासे दाखवले त्यात पिरान्हा पण होता. 


शो संपल्यावर आम्हाला उल्हास नदीवर नेले त्यापूर्वी चहा काॅफी ब्रेक ऊरकला..


नदीवर swimming, buffalo riding आणि boating होते. सगळे म्हशीवरुन फिरण्यात गुंग होते तेव्हा आम्ही सेल्फी काढण्यात बिझी होतो. जवळजवळ २ तासांनंतर जेवण होतं. साॅल्लीड भूक लागली होती म्हणून मस्तपैकी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. 



जेवणानंतर काहि वेळात snake show होता. ३ जातींचे सर्प आम्हाला दाखविण्यात आले. नागाची, धामणीची आणि खोडसे (viper) ची माहिती छान समजावुन सांगितली तसेच नंतर काहि अति उत्साही पर्याटकांनी सापाला अंगावर घेऊन सेल्फी काढल्या...


आमचा नंतर चा schedule होते बोटिंग आणि fishing


एका छोट्याशा तलावात पैंडल मारता येणारी बोट होती. Boating करून नंतर थोडीफार shopping करुन आम्ही घरी निघालो.







सगुणा बागेत कसं जायचं?
रेल्वे ने जाणार असाल तर central railway च्या नेरळ (माथेरान) स्टेशन वर उतरून वेस्ट ला बाहेर पडुन रिक्शा मिळेल. १०० जाताना आणि परतताना १३०/-.
अधिक माहितीसाठी www.sagunabaug.com येथे भेट देणे.

धन्यवाद...
निशांत पोतदार


लेख कसा वाटला ते नक्की सांगणे.




Saturday, December 27, 2014

सध्या अपडेट्स नाहीत …


माझ्या प्रिय वाचकांना माझा नमस्कार ,

कामाच्या व्यापामुळे सध्या काहीच अपडेट्स देत येत नाहीत त्याबद्दल क्षमस्व .  लवकरच काहीतरी नवीन घेऊन यायच्या प्रयत्नात आहे.  कामातून वेळ मिळाला तर नक्कीच शेअर करिन.

आपल्या सतत येणाऱ्या मेल्स बद्धल धन्यवाद.  असेच आपले प्रेम अखंड राहु दे हिच नम्र विनंती

आपला नम्र ,
निशांत पोतदार
BBM:2BAED043

पाउलवाटा बी बी एम channel : C003969E9

Sunday, February 16, 2014

उज्जैन

८ फेब्रुवारी २०१४
“अकाल मृत्यू वोह मरे जो काम करे चांडाल का..
काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का...!!”
आयुष्यात पहिल्यांदाच इंदौरला जाण्याचा योग आला. इंदौर बद्दल खूप ऐकून होतो, पण आज लग्नाला गेलो तेव्हा कळाले. मध्यप्रदेशातील इंदौर हे एक नावाजलेले शहर. मुंबई सेन्ट्रल ला जेव्हा अवंतिका एक्सप्रेस मध्ये जेव्हा बसलो तेव्हा इतकेचमाहीत होते की मेहुणीच्या लग्नाला जायचे आहे आणि दुसर्‍या दिवशी परतायचे आहे. ७ तारखेला रात्री लग्न झाले, त्याच वेळेस सासरकडच्या नातेवाईकांशी गप्पा मारताना जवळपासची माहिती विचारली, त्यावर माझे एकट्याचेच उज्जैनला जायचे ठरले.बाकीच्यांचे हो नाही असेच होते. पण शेवटी सगळे एकमत झाले आणि ८ तारखेला बायको, मेहुणा आणि सासू सासरे आम्ही यजमानांचा निरोप घेऊन उज्जैन ला जायला निघालो.
इंदौर बस डेपोवरून उज्जैनला जाणारी बस मिळाली. आणि आमचा प्रवास सुरु झाला. जवळजवळ दिड तास प्रवास करून आम्ही उज्जैनला सकाळी १०.३० ला पोहोचलो.
रिक्षा करून जवळच्या एका गेस्टहाउस वर उतरून अंघोळी उरकल्या, मधल्या वेळेत हॉटेल मालकाला जवळ बघण्यासारखे काय आहे असे विचारले असता एकदम नम्रतेने त्याने सांगीतलेकीजवळच२ मिनिटांवर श्री महाकालेश्वराचे मंदिर आहे आणि आजूबाजूला आणखी काही बघण्यासारखी मंदिरे आहेत.
1.       महाकालेश्वर मंदिर
2.       श्री बडे गणेशजी मंदिर
3.       मां हरसिद्धीमाता मंदिर
4.       राम मंदिर
5.       श्री राम घाट (शिप्रा नदी)
6.       श्री राजा विक्रमादित्य
7.       श्रीमंगलनाथ मंदिर
8.       सिद्धवट मंदिर
9.       श्रीकालभैरव मंदिर
10.   श्रीगढकालिका मंदिर
11.   श्रीभृर्थहारी गुंफा
12.   श्री संदीपनी आश्रम
वरील पैकी ६ मंदिरे जवळपासच आहेत. पूर्ण १२ मंदिरे पाहण्यासाठी महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर ओम्नी कार असतात. ड्रायवरच गाईडचे काम करतात. प्रत्येकीरुपये १००/- घेऊन सर्व मंदिरे फिरवून आणतात. (नोट: ड्रायवरचामोबाइल नंबर पुढे देत आहेच, त्यामुळे जास्त विचार करू नका.)
महाकालेश्वर मंदिर:
अति प्राचीन असे हे मंदिर आहे. मंदिरा जवळ सुद्धा गेस्ट हाउस आहेत, त्यामुळे जमल्यास रेल्वे स्टेशनावरून मंदिराजवळच उतरणे. VIP पास काढून आम्ही ५ जण आत गेलो. (VIP साठी जिथून फुलांचे ताट घ्याल त्यांचीच माणसे मदत करतात.) मंदिरात कॅमेरा नेऊ नये असे म्हणतात पण मोबाइल चालतात, आता तुम्हीच काय ते समजून घ्या. मंदिरात जाण्यापूर्वी सती मातेचे मंदिर लागते. मंदिरातील गाईड ने मार्गदर्शन केल्याप्रमाणे फटाफट VIP रांगेत उभे राहिलो. जवळजवळ अर्ध्या तासाने आम्ही मंदिराच्या गाभार्‍यात पोहोचलो. आत उतरून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करावा लागतो. महादेवाचे दर्शन जोडीने घेऊन आम्ही बाहेर आलो. मंदिराच्याच आवारात अनेक लहान मंदिरे आहेत त्यातच नवग्रह मंदिर, दास मारुती मंदिर आणि इतर ऋषींची मंदिरे आहेत. फोटो काढण्याचा मोह मला इथे पण आवरला नाही. तुमच्यासाठी सर्व फोटो खालील लिंक मध्ये देत आहेच.नवग्रह मंदिरात नवग्रह स्तोत्र म्हणून दर मारुतीच्या दर्शनाला गेलो. इथला दास मारुती हा समर्थ रामदास स्वामींच्या ११ मारुतींपैकी आहे की नाही याची माहिती मला मिळाली नाही. तुमच्या जवळ असेल तर कृपया कमेंट मध्ये पोस्ट करणे.
वेळे अभावी आम्ही पटापट दर्शन घेत निघालो. मंदिराच्या बाहेर येऊनगाईला चारा खाऊ घालून थोडेसे पुण्य पोकेट मध्ये पडून घेतले.
लगेच कार मध्ये बसून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला....
मंदिराच्या परिसरातून बाहेर आलो आणि पहिले मंदिर लागले ते बडा गणेशजी.. खूप मोठी गणेशची मूर्ती बघून मला आपल्या मुंबईतील गणेशोत्सवाची आठवण झाली. त्याच मंदिरात गाईची मूर्ती,पंचमुखी मारुती आणि इतर देऊळे आहेत.
गणपतीचे दर्शन घेऊन लगेचच आम्ही राजा विक्रमादित्य मंदिरात गेलो. गाईड च्या सांगण्यांनुसार, राजाविक्रमादित्यचे सिंहासन आकाशात उडून गेले. राजाच्या दरबारात जाण्यापूर्वी खाली काळ भैरवाचे छोटे मंदिर लागते. दर्शन घेऊन वर गेलो आणि महाकाली तसेच राजाचा दरबार बघितला.
लगेच राजा विक्रमादित्यची कुलस्वामिनीहरसिद्धी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर खूप जुने व कोरीव आहे. गाभार्‍यात वरती देवदेवतांची चित्रे आहेत. त्यामागे काही कथा असतीलच पण वेळ नसल्यामुळे जास्त माहिती घेता आली नाही.
थोडं पुढे गेल्यावर शिप्रा नदी तसेच राम घाट लागतो, याच ठिकाणी कुंभमेळा भरतो. २०१६ साली याच ठिकाणीकुंभमेळा असल्यामुळे जागोजागी तयारी चालू असलेली दिसली. त्याच पुलावर थोडं पुढे गेल्यावर एक स्मशान दिसले, असे म्हणतात याच स्मशानातून ताजी राख महाकालेश्वाराला लावली जात असे.
श्रीभृर्थहारी गुंफा:
हि गुंफा काही किलोमीटर दूर शहराच्या बाहेर आहे.श्रीभृर्थहारी संन्यासाचीहि गुंफा होती. जवळजवळ ४ फुट उंचीच्या दरवाज्यातून आत जावे लागते. ज्या व्यक्तींना हायब्लडप्रेशरचा त्रास असेल त्यांनी न जाणेच योग्य कारण आत ऑक्सिजन कमी आहे तरी आत रिस्क घेऊन गेलो. दुसऱ्या गुंफेत चारधाम ला जाणारा भुयारी मार्ग आहे. असे म्हणतात या मार्गाचे दर्शनानेच चारधाम यात्रेचे पुण्य मिळते. जोडीने पुण्य परत खिशात टाकून बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला.
श्रीगढकालिका मंदिर:
अतिप्राचीन असे कालिका देवीचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेऊन निघालो. तुम्हाला वेळ असेल तर श्रीस्थिर मन  गणेश मंदिराला नक्की भेट द्या.

श्री काळ भैरव मंदिर:
कधीहि न ऐकलेला आणि न पाहिलेला असा चमत्कार या मंदिरात पाहायला मिळाला. मंदिराच्या आवारात जशी एन्ट्री केली तशी दारूची दुकाने दिसायला लागली.फूलवाल्यांकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रांड होते. अगदी देशी पासून विदेशी पर्यंत.
तेव्हा गाईड कडून अशी माहिती मिळाली की श्री कालभैरव दारू पितो.
पहिले तर विश्वासच बसला नव्हता. पण प्रत्यक्षात लोकांना देवाला दारू पाजताना आणि देव दारू पिताना पहिले. जसे आपण बशीने चहा पितो तसेच देव चांदीच्या बशीने दारू पीत होता. असे म्हणतात की दारू मंदिराच्या बाहेर कुठेच जात नाही, नमंदिराच्या खाली. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधीने मंदिराच्या आवारात खोदून पहिले होते पण सर्व निष्फळ ठरले.
चमत्कार पाहण्यासाठी या मंदिराला नक्की भेट द्या.
दर्शनघेऊन आम्ही मंगलनाथच्या दर्शनाला निघालो.वृशिक राशीस्वामी मंगळ येथे पिंडीच्या स्वरुपात विराजमान आहे. माझी रास हीच असल्याने मनापासून दर्शन घेतले. मंदिराच्याबाहेरमंगळाची आई श्री भुवनेश्वरी मातेचे (पृथ्वी) मंदिर आहे.
वेळे अभावी थोडीच ठिकाणे फिरू शकलो तरी संदीपनी आश्रम राहिलाच, कारण५.४५ ची अवंतिका एक्सप्रेस मुंबईचे रीसर्वेशन होते.
गाईड/ड्रायवर ने उज्जैन स्टेशनाच्या बाहेर सोडले, तेथेच एका हॉटेलात आम्ही जेवलो आणि स्टेशन वर दिवसभराच्या आठवणी सोबत घेऊन गाडीची वाट पाहत थांबलो.
Name and no. of driver


कसं जायचं उज्जैनला?
मुंबईहून जाणार असाल तर मुंबई सेन्ट्रल वरून अवंतिका एक्स्प्रेस आहे. संध्याकाळी ७.०५ वाजता.
इंदौर वरून बस ने माणसी ५३/- तिकीट आहे. उज्जैन वरून जर जाणार असाल तर बाहेंच रिक्शा असतात. बस असेल पण नक्की वेळ माहीत नाही.
नोट: उज्जैनला जाणार असाल तर चांगली २-३ दिवसांची सुट्टी काढून जा तरच सर्व उज्जैन घाई न करता फिरून होईल. तसेच काही किलोमीटरवर ओंकारेश्वर आहे. संपूर्ण package रु.२७००/- मध्ये उज्जैनचे ड्रायवर फिरवून आणतील.
माझा लेख कसा वाटला? कमेंट मध्ये नक्की सांगा.

धन्यवाद..
निशांत पोतदार